शेतकरी कर्जमाफी; फडणवीसांची मोठी घोषणा!Farmers Loan Waiver

Farmers Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्यासोबत आज राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठी घोषणा केली आणि या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेण्यात आला, याची सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती आणि सरकार त्या आश्वासनावर ठाम आहे.

हे पण वाचा:
PM Kisan 22nd Installment Update पीम किसान २२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?PM Kisan 22nd Installment Update

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागील काळात एक समिती तयार केली होती, जी कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे.”

Farmers Loan Waiver कर्जमाफीसाठी समिती आणि वेळेची निश्चिती

शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतात, त्यांना त्यातून बाहेर कसे काढता येईल, याचा संपूर्ण विचार होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. याच उद्देशाने, ‘मित्रा’चे चेअरमन प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • ही समिती कर्जमाफी कशी करता येईल, त्यासाठीचे निकष काय असतील, यावर निर्णय घेईल.
  • भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दूर कसे ठेवता येईल आणि ते थकीत कर्जात जाणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना देखील ही समिती ठरवेल.

या संदर्भात सरकारने वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “आम्ही असा निर्णय केला आहे की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपले कामकाज पूर्ण करून आम्हाला अहवाल द्यावा. या अहवालावर आधारित कर्जमाफीचा अंतिम निर्णय आम्हाला तीन महिन्यांत, म्हणजेच ३० जून २०२६ पूर्वी करायचा आहे.”

हे पण वाचा:
Weather Update 2026 या जिल्ह्यांत तापमानाचा पारा खाली जाणार; थंडीचा कडाका वाढणार!Weather Update 2026

तत्काळ मदत आणि रब्बी हंगामासाठी तरतूद

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे.

फडणवीस म्हणाले, “आम्ही पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बाजूने आहोत आणि आम्ही दिलेले आश्वासन पाळू. परंतु, आता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणं आवश्यक आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले नाहीत, तर शेतकरी रब्बीचा पेरा देखील करू शकणार नाहीत.”

त्यामुळे, पहिल्यांदा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे दिले पाहिजेत, त्याची सगळी तरतूद सरकारने केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा:
ladaki bahin yojana update आचारसंहितेतही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का ?पहा सविस्तर माहिती ladaki bahin yojana update

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून, निर्धारित वेळेत सरकार आपला निर्णय जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment