धनत्रयोदशीला ‘अस्मानी संकट’; पुढील ४८ तास धो-धो बरसणार! आयएमडीचा अलर्ट IMD Weather Alert

IMD Weather Alert : दिवाळीच्या तोंडावर आणि विशेषतः धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दिवशीच देशातील काही राज्यांवर ‘अस्मानी संकट’ येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे, तसेच ४८ तासांत अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे.

IMD Weather Alert चक्रीवादळाचा धोका

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत अरबी समुद्रात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे संभाव्य चक्रीवादळ २४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ईशान्य मान्सूनचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. या बदलामुळे पुढील ४८ तासांत महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

हे पण वाचा:
havaman andaj today 11 जुलै 2026 पावसाचा जोर ओसरला! आता कधी पाऊस येणार? पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज  havaman andaj today

धनत्रयोदशीला वातावरण कसे असेल?

  • दक्षिण भारत: अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे धनत्रयोदशीच्या काळात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे.
  • महाराष्ट्र (मुंबई अलर्ट): मुंबईमध्ये सध्या तापमान ३७ अंशांपर्यंत वाढले असून, ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. मात्र, पुढील ४८ तासांत मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, शहरासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पावसाच्या सरी कोसळल्यास मुंबईकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे आणि दिवाळीपर्यंत हवामान थंड राहू शकते.
  • उत्तर भारत: या काळात उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भागात हवामान स्वच्छ राहील. मात्र, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये हिमवृष्टी (Snowfall) आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. परिणामी, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील ४८ तासांसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment