Ladki Bahin ekyc Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत विधवा, घटस्फोटित किंवा ज्यांना पती/वडिलांचे आधार कार्ड आणि ओटीपी (OTP) उपलब्ध होत नाही, अशा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली असून, या विशिष्ट प्रकरणांमध्ये तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशा महिलांसाठी e-KYC करताना ओटीपी बायपास करण्याची किंवा त्यात आवश्यक बदल करण्याची सोय लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. शासनाकडून याबाबत तांत्रिक तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.
काय करावे?
- ज्यांना ओटीपी मिळत नाही, अशा महिलांनी सध्या e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाई करू नये, असे सूचित करण्यात आले आहे.
- अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी संबंधित महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.
Ladki Bahin ekyc Update मुदत वाढवली
राज्यात गेल्या काही महिन्यांत आलेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती, तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना वेळेत e-KYC करता आली नाही. या पार्श्वभूमीवर, शासनाने अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसह सर्वच लाभार्थ्यांसाठी e-KYC करण्याची मुदत साधारणपणे १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मुदत आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्यापुढेही वाढण्याची शक्यता आहे.
e-KYC कशासाठी? संभ्रम दूर करा
योजनेत पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील (पती/वडील) सदस्यांचे आधार कार्ड, तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का, याची माहिती गोळा केली जात आहे.
याबाबत लाभार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे
- e-KYC मुळे योजनेत केवळ पारदर्शकता आणली जात आहे.
- ‘केवायसी केली तरच पैसे मिळतील’ किंवा ‘केवायसी नाही केली तर अपात्र होणार’, असा याचा अर्थ नाही.
- योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला e-KYC केल्यानंतरही अपात्रच राहतील. पात्र-अपात्रतेचा निर्णय योजनेच्या मूळ नियमांनुसारच होणार आहे.
पडताळणी पूर्ण, थकीत हप्ते मिळाले
शासनाने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जांची पडताळणी केली होती, ज्यात बहुतांश अर्ज पात्र आढळले आहेत. उर्वरित अर्जांची तपासणी सुरू असून, त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल.
ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे हप्ते बंद झाले होते, त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्ते सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत.