शेतकऱ्यांना मोठा धक्का! रब्बी हंगामापूर्वीच रासायनिक खतांचे दर वाढले; जाणून घ्या नवे दर Fertilizer Prices

Fertilizer Prices : अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता अशा अनेक संकटांशी लढत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे एक नवीन आणि मोठे संकट उभे राहिले आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांच्या भावात मोठी आणि अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध रासायनिक खतांमध्ये प्रति बॅगमागे २०० ते ३०० रुपये इतकी वाढ झाली आहे. प्रमुख मिश्र खतांचे दर वाढले असले तरी, शेतमालाच्या भावात मात्र म्हणावी तशी वाढ झालेली नाही.

हे पण वाचा:
ladaki bahin yojana update आचारसंहितेतही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का ?पहा सविस्तर माहिती ladaki bahin yojana update

Fertilizer Prices उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ जमेना

सध्या कांदा, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला यांसारख्या प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाहीये. त्यातच आता उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावात वाढ झाल्याने, शेतकऱ्यांसाठी शेती करणे आर्थिकदृष्ट्या अधिक कठीण बनले आहे.

रब्बी हंगामात गहू, हरभरा यांसारख्या पिकांना खतांची मोठी गरज भासणार आहे. दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भांडवल गुंतवावे लागणार आहे. येणाऱ्या काळात खतांच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

लिंकिंगमुळे विक्रेत्यांचीही अडचण

खतांच्या दरवाढीसोबतच कृषी विक्रेत्यांसमोर देखील वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.

हे पण वाचा:
Cotton Rate Today पहा आजचे कापूस दर  Cotton Rate Today
  • उत्पादनांचे लिंकिंग: कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्यूबल खते, मायक्रोला किंवा मायक्रोराइझा यांसारख्या इतर उत्पादनांचे लिंकिंग केले जाते. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्ट्सना मागणी नसल्याने, हा अतिरिक्त माल नाइलाजाने इतर खतांसोबत शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
  • युरियाचे दर: युरिया खत २६६ रुपयांवर विक्री करू नये, असे सरकारी निर्देश असतानाही, वाहतुकीसाठी भाडे मिळत नसल्याने दुकानदारांना प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये जादा दराने नाइलाजाने विक्री करावी लागत आहे. यामुळे जादा दराची ओरड शेतकऱ्यांकडून केली जाते आणि दुकानदारांकडूनही मोजक्याच खताचा उठाव केला जातो.

शेतकऱ्यांकडून दर कपातीची मागणी

उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घट होत आहे. या विषम परिस्थितीमुळे शेतीक्षेत्रात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रासायनिक खतांच्या दरात झालेली ही वाढ केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

शेतकरी वर्गातून केंद्र सरकारकडे तातडीने रासायनिक खतांचे दर कमी करावेत अशी तीव्र मागणी होत आहे. सरकारने खतांचे दर कमी करून उत्पादन खर्च नियंत्रणात आणावा, त्याचबरोबर शेतमालाचे बाजारभाव वाढवावेत, तरच शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा:
PAN Card आता मोबाईलवरून नवीन पॅन कार्ड काढा, पहा संपूर्ण प्रोसेस PAN Card

Leave a Comment